क्षेत्रपाल कालभैरवाय नमः



लहानपणापासूनच कुलदैवत, कुलस्वामिनी आणि  कुलपुरुष यांचे महत्व आजी कडून कळले होते. त्यामुळे दरवर्षी देवाला जाणे, कुलास्वमिनीची ओटी भरणे ह्या गोष्टी माहेरी नियमित पणे केलेल्या मी पहिल्या होत्या. लग्न जमल्या नंतर आता आपली कुलस्वामिनी कोण आणि कुलदैवत कोण हेही मला जाणून घ्यायचे होते. साधारणपणे खंडोबा हे कुलदैवत बऱ्याच जणांचे असतेच पण आमचे म्हणजेच माझ्या सासरकडचे कुलदैवत काळभैरव आणि भैरीभवानी असल्याने; काळभैरव हे दैवत माझ्या आयुष्यात माझ्या लग्नानंतर आले. जसे माझ्या माहेरी खंडोबाची पूजा अर्चा केली जायची, एकविरा देवी आणि व्याघ्रम्बरी देवीची पूजा केली जायची तसेच सासरी सुद्धा काळभैरव आणि तुळजाभवानी देवीची पूजा -आराधना केली जाते. नेहमीच्या सवयी प्रमाणेच मला या देवते बद्दलही जाणून घेण्याची मला उत्सुकता होती; त्यामुळे मी देवतेचा फोटो किंवा पोथी शोधण्यास सुरवात केली. माझ्या सासरी  वर्षातून एकदा काळभैरव जयंतीनिमित्त कुलदेवतेला जायची प्रथा होतीच; पण लग्नानंतर नवीन जोडपे देवाला घेऊन जातात तसेच संगमेश्वर येथील कालभैरव आणि भैरी भवानीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो, पहिल्यांदीच मी या देवतेच्या मंदिरात जाणार होते. शिव-शंकराचे हे उग्र रूप आहे हे त्याच्या नाव वरूनच लक्षात आले होतेच. त्यामुळे एक वेगळेच दडपण माझ्या मनात होते. 

आमचे गाव गुहागर जवळील अंजनवेल आणि संगमेश्वर येथे असलेले भैरीभवानीचे मंदिर हे आमचे कुलदैवत. मंदिर परिसर फार जुन्या वाड्या आणि जुन्या ठेवणीच्या घरांनी वेढलेला आहे. जवळच रहाणाऱ्या गुरवान ( गुरुजी) कडे आम्ही फ्रेश झालो आणि समोरच असलेल्या मंदिरात प्रवेश केला. नारळी-पोफळी आणि सुपारीच्या झाडांनी वेढलेला हा परिसर, मस्त गार वारा आणि मंदिराच्या पाठी असलेल्या झऱ्याचा हळुवार आवाज लहान मुलांप्रमाणे  निरव शांततेत अल्लडपणे बाधा आणत होता. आम्ही त्याच झर्याच्या पाण्यात पायावर पाणी घेतले आणि गाभाऱ्यात प्रवेश केला. नेहमी प्रमाणे आपण मंदिरातील घंटा वाजवून आत शिरतो तसेच येथेही केले गेले. मंदिरातील प्रसन्न वातावरण, धुपाचा सुगंध आणि नुकतीच पूजा आवरल्याने टवटवीत फुलांनी सजवलेले देव फारच नयनरम्य वातावरण होते. माझ्या आई-पपांनी मनोभावे पूजा केली ओटी भरली आणि हाताची ओंजळ करून माझ्या लेकीला आपल्या ओटीत घातली आहे तिचा सांभाळ करा देवा असे म्हणताच काळ भैरवाच्या डोक्या वरील लाल चुटूक जास्वंदीचे फुल टपकन माझ्या पप्पांच्या ओंजळीत पडले. 

मी नेहमीच म्हणते "जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दयाघना" हे मला त्या दिवशी मनोमनी पटले. आणि त्या दिवसा पासून आज तागायत देव माझ्या पाठीशी सदैव रक्षणासाठी उभे आहेत याची प्रचीती ते वारंवार देत्तात. हा माझ्या मनातला भाव तुमच्या सोबत काळभैरव जयंती निमित्त शेयर करावासा वाटला.

पाहूया कालभैरव देवाची माहिती आणि महती ज्याची माहिती मी थोडी माझ्या जवळ असलेल्या पोथीतून व काही माहिती सोशल साईट वरून गोळा करून संकलित केली आहे.

भैरव मंदिर अनेक ठिकाणी असते, मंदिर नसले तरी एखाद्या मंदिराच्या बाह्य भिंतीवर भैरव असतोच. 

भैरव म्हणजे भरण करणारा किंवा भीषण. शिवाच्या रौद्र प्रकाराचेच हे एक रुप. याला अनेक नांवानी संबोधतात बहिरोबा, भैरोबा असेही म्हणतात. क्षेत्रपालही म्हणतात. हा काशीचा अधिपती व रक्षक आहे असे मानतात. 

पुराणात आलेली यासंबंधी कथा : 

शिव महापुराणाच्या आधारे असे संगतात कि, भगवान विष्णु आणि ब्रह्मा याच्यात संवाद चालला असता ब्रह्मा म्हणाले के, मीच या सृष्टीचा कर्ता असून सर्व देवांनी माझीच स्तुती करावी. हे ऐकून भगवान शिवांना क्रोध आला, आणि त्यांनी काळभैरवाची, ब्रह्माला शासन करण्यासाठी, उत्पत्ती केली. ब्रह्माच्या पाच मस्तकांपैकी एक मस्तक काळभैरवाने उडवले. आणि तेव्हापासून ब्रह्माला चारच डोकी आहेत. परंतु ते कापलेले मस्तक भैरवाचेच मस्तक आहे असे दिसू लागले, आणि त्याला ब्रह्माच्या शिरच्छेदाबद्दल अपराधी भावना वाटू लागली. आणि त्यामुळे कित्येक युगांपर्यंत, तो पर्यंत पापमुक्त होत नाही, तो पर्यंत काळभैरव ते मस्तक वाहत होते. ब्रह्महत्येचे पाप धुवायचे तर तिर्थाटन केले पाहिजे. शिवाने बारा वर्ष कापालिक व्रत केले. बारव्या वर्षी तो काशीस पोचला तेव्हा त्याच्या हातातून ब्रह्मदेवाचे कपाल गळून पडले. म्हणूनच काशीस कपालमोचन असे ही म्हणतात. 

दुसरी एक कथा अशी सांगतात के, देवांचा राजा दक्षची कन्या सतीने मनोमन 

 भगवान शिवालाच आपला वर मानले होते, आणि विवाह केला, परंतु हे दक्षाला मान्य नव्हते, कारण शिव स्मशानात राहतो, अंगाला प्रेतभस्म लावतो, ध्यान विचित्र आहे, आणि सोबत भुते असतात. नंतर जेव्हा दक्षाने मोठा यज्ञ केला तेव्हा त्याने शिव सतील बोलावले नाही. परंतु सती न बोलावताहि यज्ञाला आली, परंतु दक्ष शिवाला दुषणे देउन, अर्वाच्य भाषेत शिव्याशाप देऊ लागला, हे सहन न होऊन सतीने तिथ्व्च प्राणत्याग केला. हे पाहून शिवाला अतिशय दुःख झाले, आणि त्याने रागाने यज्ञाचा विध्वंस केला आणि दक्षाचा वध केला. दुःख अनावर झाल्याने, शिव सतीचे प्रेत खांद्यावर घेऊन त्रिलोकात फिरु लागला. आणि यामुळे सृष्टीचा नाश होऊ लागला. ते पाहुन भगवन विष्णुने आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे तुकडे केले, तेव्हा हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पृथ्वीवर पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाले. या शक्तिपीठांच्या रक्षणासाठी शिवाने काळभैरवाची उत्पत्ती केली, म्हणुन त्या त्या ठिकाणी काळभैरवाचे मंदिर असतेच.

पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात. शैव आगमांनुसार एकूण चौसष्ठ भैरवांचे आठ वर्ग असून त्या वर्गांच्या आठ प्रमुखांना ‘अष्टभैरव’ म्हणतात. 

अष्टभैरवांच्या नावांविषयी बरेच मतभेद आहेत. संहार वा महासंहार, असितांग, रूरू, काल, क्रोध, ताम्रचूड, कपाल, चंद्रचूड, रुद्रभैरव, चंड, उन्मत्त व भीषण या नावांपैकी वेगवेगळ्या आठ नावांचा अष्टभैरवांत समावेश केला जातो. विद्या, काम, नाग, स्वच्छंद, लम्बित, देव, उग्र व विघ्न या प्रत्येकाला शेवटी ‘राज’ हे पद जोडूनही ही यादी केली जाते.

हिंदू पंचांग नुसार ‘काल भैरव जयंती’ प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते. या दिवसाला ‘कालाष्टमी’ देखील म्हणतात. शास्त्रात नमूद केलेल्या कथांनुसार शिवरूपी भगवान ‘काल भैरव’ यांचा जन्म याच तिथीला झाला होता. काल भैरव जयंतीच्या दिवशी भगवान काल भैरव यांची प्रार्थना करण्याचे काही विशेष विधी आहेत. या खास दिवशी काल भैरवाची पूजा केली गेली, तर ते भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण करतात, असे म्हटले जाते.

भगवान विश्वनाथ हे काशीचे राजा आहे आणि कालभैरव या नगरचे कोतवाल मानले जातात. म्हणून ह्यांना काशीचे कोतवाल म्हणतात. ह्यांच्या दर्शनाच्या शिवाय बाबा विश्वनाथाचे दर्शन करणे अपूर्ण मानतात. म्हणून नेहमी बाबा विश्वनाथाचे दर्शन केल्यावर कालभैरवाचे दर्शन करावे. काळ देखील ह्यांना भिऊन असतो. म्हणून यांना कालभैरव आणि हातामध्ये त्रिशूळ, तलवार आणि काठी किंवा दांडा असल्यामुळे दंडपाणी देखील म्हणतात. ह्यांची पूजा केल्यानं घरातील नकारात्मक शक्ती, जादू-तोटके, भूतबाधा असे कोणत्याही प्रकारचे भय होत नाही तर यांची पूजा केल्यानं माणसाचा आत्मविश्वास वाढतो.

अतिशय जागृत देव आहेत हे यांचे रूप जरी उग्र असले तरी त्यांच्या निस्सीम भक्तांच्या पाठी ते एखद्या रक्षण कर्त्या प्रमाणेच उभे असतात.

त्यांच्या साठी भूत्नाथांच्या आरतीतील एक ओळ आठवते 

उग्र हे रूप तुझे भूता खेतान्सी वाटे 

भक्तांच्या काजा येत माय माउली प्रगटे 

कालभैरवाय नमः

॥ अथ ध्यानम ॥

ॐ वाराणस्यां भैरवो देवः । संसारभयनाशनः ।

अनेक जन्मकृतं पापम् । स्मरणेन विनश्यति ॥

श्री गणेशाय नमः । ॐ नमः । सिद्धम्।

 



मसला मसाल्याचा भाग १० जायफळ आणि जायपत्री




आपल्या रोजच्या मिसळण्याच्या डब्ब्यात हिंग, राई, जिरं, हळद, आणि तिखट नेहमीच असते. पण त्या पुढचे मसाले जसे कि तमालपत्र, दालचिनी लवंग,काळीमिरी, वेलची, शहाजीरा, मोठी वेलची हे मात्र वेगळ्या मसाल्याच्या डब्ब्यात असते. हे सगळे मसाले अख्खे वापरले जातात किंवा त्या सगळ्याची योग्य प्रमाणात माप घेऊन त्यांची पावडर करून साठवण केली जाते. आमच्या कडे म्हणजे माझ्या माहेरी आणि सासरी सुद्धा कायम घरचाच गरम मसाला वापरला जातो ज्याची माप आणि तयर करण्याची कृती मी सांगणारच आहे. या मसाल्यान मध्ये जायपत्री आणि जायफळ याची माहिती मिळवताना मला समजले कि जायपत्री हि जायफळ या फळाच्या भोवतीच त्याला लागून असते. 

पाहूया जायफळ आणि जायपत्रीची माहिती जी मला इतर सोशल साईटस वरून मिळाली आणि एकत्रित करून तुमच्या सोबत शेयर केली आहे. 

वनस्पतिशास्त्रानुसार जायफळ (शास्त्रीय नाव: Myristica fragrans, मायरिस्टिका फ्रॅग्रन्स ; इंग्लिश: Nutmeg, नटमेग ;) हे मायरिस्टिका प्रजातीत मोडणाऱ्या अनेक जातींच्या वृक्षांसाठी योजले जाणारे नाव आहे. व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची जात म्हणजे 'मायरिस्टिका फ्रॅग्रन्स'(Myristica fragrans) होय. ही जात मूळची इंडोनेशियातील मोलुक्का द्वीपसमूहातील बांदा बेटांवरची आहे. जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री अशी दोन प्रमुख मसाल्याची उत्पादने मिळतात.





 जायफळ हे जायफळाच्या झाडाचे बी होय. जायपत्री म्हणजे या बीची वाळलेली, लालसर रंगाची साल होय. जायफळाचे झाड लावल्यापासून ७ ते ९ वर्षांनी त्याला पहिल्यांदा फळे धरतात व २० वर्षांनंतर झाड पूर्ण जोमाने उत्पादन देऊ लागते. मसाल्यांमध्ये अनेकदा जायफळाची पूड वापरली जाते. एकाच झाडापासून दोन मसाल्याचे पदार्थ निर्मिणारे हे एकमेव झाड आहे. जायफळ किसणीवर सहज किसता येते, आणि सहाणीवर उगाळता येते.

जायफळात आढळणारे ‘ट्रायमिरस्ट्रेन’ (trimyristin) हा घटक शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था आरामदायी स्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे रात्री उत्तम झोप येण्यासाठी जायफळ घातलेला पदार्थ उपयोगी पडतो. नाटकाच्या किंवा संगीताच्या कार्यक्रमाच्या मध्यांतरात वेलदोडा-जायफळ घातलेली काॅफी आवर्जून पितात.जायफळ चहा, कॉफी, दुधात व मिठाईत स्वादासाठी वापरतात हे सर्वश्रुत आहे; पण याचा औषधीतदेखील मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. मोठे वजनदार, टणक जायफळ उत्तम प्रतीचे असते. जायफळ अनेक वर्षे तुपात ठेवले असता खराब होत नाही. जायफळापासून तेल निघते. या स्थिर तेलास ‘जातिफळ-नवनीत’म्हणतात. 

भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये आहे. जायफळ आणि वेलचीने तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत.

 मायरिस्टिका फ्रॅग्रन्स ही जायफळाची सर्वसाधारण जात इंडोनेशियातील बांदा बेटांव्यतिरिक्त, मलेशियातील पेनांग बेटावर तसेच कॅरिबिअन भागातील ग्रॅनडा येथे आढळून येते. दक्षिण भारतात केरळामध्ये ही जात जोपासली जाते. न्यू गिनी येथील पापुअन नटमेग मायरिस्टिका अर्जेंटिया आणि भारतातील बॉंबे नटमेग मायरिस्टिका मलाबारिका या जायफळाच्या इतर प्रमुख जाती होत.

 आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फायदेशीर असतात. गरम मसाल्यात वापर केलं जाणारं जायफळ त्यापैकीच एक आहे. जायफळमध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात. आकारानं लहान असून सुद्धा ज्या बियांमधून जायफळ काढलं जातं त्या बिया आणि ते झाड सुद्धा खूप औषधीयुक्त असतं. आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंटचं काम जायफळ करतं. जायफळ अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणांनीही परिपूर्ण असतं. म्हणूनच डाएटमध्ये थोड्या-थोड्या प्रमाणात जायफळचा वापर केला तर अनेक आजारांपासून आपला बचाव करता येतो. सोबतच पचनक्रियेशी संबंधित संक्रमण आणि आजारांमध्ये सुद्धा जायफळ खूप उपयुक्त ठरतं. तर जाणून घ्या जायफळचे औषधीय गुण...

 जायफळचा व्यवस्थित डोस घेतल्यास हृदयविकारांपासून आपण बचाव करू शकतो. हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी करण्यासाठीही जायफळ उपयुक्त ठरतं.

 जायफळमध्ये अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुण असतात. त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या हल्ल्यापासून शरीराचं रक्षण जायफळ करतं. म्हणूनच आपल्या जेवणात, स्वयंपाकात जायफळचा वापर केल्यानं संक्रमण होण्याची शक्यता कमीच असते. एव्हढंच नाही तर जायफळचं पावडर कुठल्याही इंफेक्शनच्या ठिकाणी लावलं तर ती जखम किंवा इंफेक्शन बरं होतं.: जायफळ उदासीनतेवर उपयुक्त ठरतं आणि म्हणूनच मूड स्विंग होत असल्याचं ते चांगलं करण्याचं काम जायफळ करतं. डिप्रेशन सारख्या लक्षणांवर याचा खूप फायदा होतो. अशा परिस्थितीत दररोज जायफळचा उपयोग खाण्यात करणं आवश्यक आहे.

जायफळच्या अर्कामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण खूप कमी होतं आणि स्वादुपिंडाचं काम वाढवतं.

जायफळ कफवातशामक, शोथहर, वेदनास्थापन, उत्तेजक, कुष्ठघ्न, दुर्गंधीनाशक व वातशामक आहे.

 जायफळ हे 10 ते 20 मिटर उंच वाढणारे सदापर्णी झाड आहे. जायफळामध्‍ये पपई व कोकम या प्रमाणेच नर व मादी झाडे वेगवेगळी असतात. जायफळ बागेमध्‍ये सुमारे 50 टकके झाडे मादी 45 टक्‍के नर व 5 टक्‍के संयुक्‍त फूले असणारे झाडे निघतात. नराच्‍या झाडास गुच्‍छाने फुले लागतात तर मादी झाडास एक एकटी फूले लागतात. जायफळाची फळे चिकुच्‍या आकाराची पण गुळगुळीत व पिवळसर रंगाची असतात. फळांच्‍या टरफलांच्‍या आतील अंगास गुलाबी रंगाची जाळी असते. या जाळीस जायपत्री म्‍हणतात. फळांच्‍या टरफलांचा उपयोग लोणचे, चटणी, मुरंबा इत्‍यादि साठी करतात. जायफळाचा उपयोग मिठाई स्‍वादिष्‍ट करण्‍यासाठी तसेच जायफळ व जायपत्रीचा उपयोग मसाल्‍यात केला जातो. जायफळातील तेलाचा उपयोग औषध, साबण, टुथपेस्‍ट चॉकलेट इत्‍यादी उत्‍पादनात केला जातो.

 स्वयंपाक घरात आरोग्यविषयक समस्यांवर लाभदायक अशा अनेक वस्तू आहेत, ज्या महागड्या उपचारांपेक्षाही तितक्याच गुणकारी ठरतात. त्यापैकी एक म्हणजे जायफळ होय. जाणून घेऊया की काय आहेत जायफळचे फायदे. * जायफळ वापरल्याने त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर होतात. त्यातीलच डोळ्यांखालचा काळेपणा होय. जायफळाची पेस्ट बनवून डोळ्याखाली लावल्याने डोळ्याखालचा काळेपणा कमी होण्यास मदत होते. सर्वप्रथम जायफळाची पेस्ट बनवून डोळ्याखालील काळ्या भागावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर पाण्याने धुवून घ्या. असे रोज केल्यास डोळ्याखालचे काळे डाग निघून जातील. * जायफळ गुणधर्माने गरम असल्यामुळे लहान मुलांसाठी हे एक वरदान आहे. थंडीपासून बचावासाठी हिवाळ्यात लहान मुलांना हे दिले जाते. जायफळ मोहरीच्या तेलात मिसळून मुलांना दिले जाते. * जखमेवरही जायफळ गुणकारी ठरते. यासाठी जखम झालेल्या ठिकाणी तयार झालेले निशाण दूर करण्यासाठी जायफळाचे चूर्ण बनवून मोहरीच्या तेलासोबत लावावे.

 जायपत्री आणि जायफळाचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे –

 जायफळ किसून गरम भांडय़ात थोडं गरम करावं. त्यात तेवढाच गूळ घालावा. त्याच्या लहान लहान गोळ्या कराव्यात. या गोळ्या डायरियासारख्या आजारात घेतल्यास लवकर आराम पडतो.

 जायफळाची पूड लिंबाच्या रसात घोळवून त्याची पेस्ट चेह-यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो. ही पेस्ट एक उत्तम ब्लीच समजलं जातं.

 पॅरालिसिसच्या रुग्णांची जीभ जड होते, तेव्हा त्या रुग्णांच्या तोंडात जायफळ चघळायला दिल्याने रुग्णांना अतिशय उपयोगी ठरतं.

 निद्रानाश होत असल्यास जायफळाची पूड तुपात घोळवून ती कपाळावर लावल्याने झोप येते आणि निद्रानाशाचा त्रास कमी होतो.

 अस्थम्याच्या झटक्यावर जायपत्री अतिशय गुणकारी ठरते. एक ग्रॅम जायपत्री मधात घोळवून दिवसातून ४-५ वेळा खाल्ल्याने अस्थम्याच्या रुग्णांना बराच आराम पडतो.

 जायपत्री तेलाच्या सेवनाने लहान मुलांची भूक वाढते आणि वजन कमी करण्यासही ती उपयुक्त ठरते.

 अति तहान लागत असल्यास नैसर्गिक चहात (हर्बल टी)मध्ये ३ ग्रॅम जायपत्री टाकून तो चहा प्यावा. यामुळे लगेच आराम पडतो.

 जायपत्री तेल आणि नारळाचं तेल दोन्ही एकत्र करून त्याने टाळूला मालीश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची वाढ होते.

बिघडलेल्या जायफळांपासून चरबीयुक्त पदार्थ काढतात, त्यास जायफळाचे ‘लोणी’ म्हणतात; त्याचा उपयोग साबणास सुवास आणण्यासाठी करतात; शिवाय मलमाकरिता आणि संधिवात, पक्षाघात, मुरगळणे इत्यादींवर लावण्याकरिता करतात. पत्रीची चव व वास बियांप्रमाणेच असतात. सालीपासून ‘कीनो’ नावाचा डिंक मिळतो. पाने, फुले आणि साल यांपासूनही बाष्पनशील तेल मिळते. बियांच्या किंवा पत्रीच्या तेलाचा उपयोग अन्नपदार्थ, पेये, साबण, तंबाखू, दंतमंजने व सुगंधी प्रसाधने, मर्दनाची किंवा केसांची तेले यांत करतात. पक्व फळांच्या सालीचे लोणचे, मुरंबे वगैरे बनवितात.

कशी वाटली जायफळ आणि जायपत्री ची माहिती कॉमेंट नक्की करा. 

मामलेदार मिसळ







मामलेदार मिसळ म्हणजेच तहसीलदार कचेरी कँटीनचे सर्वेसर्वा श्री. लक्ष्मण मुरुडेश्वर यांचे आज कोरोना मुळे निधन झाले. ही बातमी व्हाट्सएपच्या ग्रुपवर आली आणि आठवणींचे चक्र गर्रकन फिरून साधारण पस्तीस-चाळीस वर्ष पाठी गेलं. 
त्यावेळी मी दहा ते बारा वर्षाची असेंन; बरेचदा आजी-आजोबांसोबत जिल्हापरिषद जवळील सेन्ट्रल बँकेत मी जायची आणि बॅंकेतील कामं उरकली कि त्यानंतर मामलेदारची मिसळ खाण्याचा ठरलेला कार्यक्रम असायचा. ती झणझणीत, ठसकेबाज, लालभडक मिसळ खाताना मला नुसते डोळ्यातून पाणी अन कानातून वाफा यायच्या पण तरीही पाण्याचे ग्लासच्या ग्लास पीत त्या झणझणीत मिसळीवर ताव मारला जायचा. त्यांनतर मिळणारे ताक मात्र आम्ही आवर्जून प्यायचो. या आठवणींची एक लांबलचक दोर तयार झाली ती थांबेच ना; कारण शाळेनंतर अनेकदा तसेच कॉलेजमध्ये असताना कित्येकदा त्यानंतर मित्र-मैत्रिणीच्या सोबत, आई-बाबा सोबत कोणतेही वेळ काळ आणि निमित्त न लागता मामलेदार मिसळीचा आस्वाद मी न मोजता येईल इतके वेळा घेतला आहे आणि अजूनही आमच्याकडे जरी आम्ही घोड्बंदेरला राहायला गेलो असलो तरी ठाण्यात आल्यावर आवर्जून मिसळीचे पार्सल घेऊन जातो. 

काही समीकरण अगदी ठरलेली असत्तात तेच ठाणे आणि मामलेदारची मिसळ हे समीकरण अगदीच जुनं आणि ठाण्याची ओळख ठेवणारे आहे. पाहूया मामलेदार मिसळीची माहिती.

 लक्ष्मण मुर्डेश्वर हे त्यांच्या वडिलांसह म्हणजे  नरसिंह मुर्डेश्वर यांच्यासह मुंबईत आले तेव्हा ते केवळ ४ वर्षांचे होते. ठाण्यात आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी उद्योग करावा, या हेतून आजचे तहसीलदार कार्यालय म्हणजेच त्यावेळच्या मामलेदार कचेरीच्या बाहेरची जागा शासनाकडून भाड्याने घेतली आणि तिथे कँटीन सुरू केले होते. मूळचे कर्नाटकचे असलेल्या मुर्डेश्वर यांनी ठाण्यात १९४६ साली तहसील कार्यालयाबाहेर 'मामलेदार मिसळ' सुरू केली होती. मात्र, काही वर्षांनी म्हणजे १९५२ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्यावर आली. तेव्हापासून ते कँटीन चालवत होते. मामलेदार मिसळीला आज ७० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यानंतर आज 'मामलेदार मिसळ' हा एक ब्रँड झाला आहे. मामलेदार मिसळी'ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जागतिक ओळख मिळवून देण्यात लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.  ठाण्यातील खाद्य ते मिष्टान्न विक्रेता संघाचे २७ वर्ष ते खजिनदार होते.

 सर्वात तिखट मिसळ अशी या मिसळीची ख्याती आहे. मामलेदार मिसळ तीन प्रकारांमध्ये मिळते. कमी तिखट, मध्यम तिखट आणि खूप तिखट. यातली खूप तिखट मिसळ खाणं हे साध्यासुध्या माणसाचे काम नाही. पट्टीचा तिखट खाणाराच तिथे पाहिजे. ठाणे स्टेशनजवळ असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयावर एका छोट्याश्या कँटिनमध्ये या मिसळीचा प्रवास सुरु झाला. ५० स्क्वेअर फुटांवरुन हे कँटिन ५०० स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त मोठ्या जागेत गेले. मात्र या मिसळीची चव किंचितही बदलली नाही. इथे मिसळ खायला बसल्यावर तुमच्यासमोर पाण्याचे भरपूर ग्लास ठेवले जातात. नवख्या लोकांना एवढे ग्लास का ठेवले जात असतील हा प्रश्न पडतोच. मात्र मिसळीचा पहिला घास खाल्यानंतर कळते की एवढं पाणी का आणले आहे. मामलेदार मिसळ सुरु करणाऱ्या नरसिंह मुर्डेश्वर यांच्या पत्नीने या मिसळीसाठीचा मसाला सर्वात आधी तयार केला होता.आजही त्याच पद्धतीचा मसाला वापरुन ही मिसळ तयार केली जाते. त्यामुळे मिसळीच्या चवीत फरक पडलेला नाही.

सकाळी चार वाजता या मामलेदार केंतीन ची सुरुवात होते. सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत रोज साधारण तीन ते साडेतीन हजार लोकं या मिसळीचा आस्वाद घेतात आणि शनिवार- रविवार तर हा आकडा पाच ते सहा हजारावर जातो. आता मामलेदार मिसळीच्या शाखाही बर्याच ठिकाणी चालू झाल्या आहेत. 

झणझणीत लाल रस्सा आणि ताजे मऊशार पाव असा बेत समोर आला की भल्याभल्यांचे जिभेवरील नियंत्रण सुटते आणि तेलाने काठोकाठ, चमचमीत  मिसळीचा घास घेतला जातो. या मिसळी सोबत फरसाण  दिले जाते जे याच ठिकाणी बनवले जाते. मिसळ फरसाण कांदा लिंबू आणि छोट्या पुडीतील बटाटा भाजी एकत्र केली कि जी स्वादिष्ट मिसळ तयार होते तिची चव कायम जिभेवर रेंगाळत राहतेच. 

अनेकदा गडकरी रंगायतन मध्ये नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर मामलेदार मिसळीचा स्वाद घेतलेले मराठी नट आणि ठाण्यातील सभा किंवा मिटींग्स आवरल्यावर मिसळीचा स्वाद घेतलेले राजकारणी मंडळी यांचे अभिप्राय आपण वाचलेच असतील. जो एकदा या मिसळीचीच घेतो तो परत आपल्या नातेवाईकांना किंवा मित्र मंडळींना मामलेदारची मिसळ खाऊ घालतोच. या मिसळीची वाटचाल अशीच पुढे चौ राहो आणि आम्हा ठाणेकरांना अभिमानाने  कायम सांगता येवो !!!!! चवीने खाणार त्याला मामलेदार मिसळ खायला मिळणार !!!!



 





त्रिपुरारी पूर्णिमा

 



भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिना महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते. कार्तिकेयांना दक्षिण दिशेचे स्वामी मानले जाते.

कार्तिक महिन्यातील पूर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात (उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात) लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो.बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.  शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते. उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजन केले जाते. या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतला अशीही धारणा आहे.

 त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात.वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते असे मानले जाते. या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन तुळशी वाहून आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल वाहून पूजा केली जाते हे या पूजेचे विशेष महत्त्व आहे. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहिली जाते परंतु या पूजेचा त्याला अपवाद आहे. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरांतसुद्धा 'हरिहर' पूजा केली जाते. 

त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते.मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. भाविक भगवान शंकरापुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात.

दीपोत्सव झाल्यानंतर कार्तिक पौर्णिमेला देशातील काही ठिकाणि देवदिवाळी साजरी केली जाते. तर काही ठिकाणी मार्गशीर्ष प्रतिपदेला देवदिवाळी साजरी केली जाते. काही ठिकाणी या दिवशी बैलांच्या झुंजी लावण्याची चाल आहे. कार्तिक पौर्णिमेला बनारसमध्ये संपूर्ण नगरीला दिव्यांनी सुशोभित केले जाते. गेल्या अनेक शतकांपासून ही परंपरा प्रचलित असल्याचे दिसून येते.

दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेला देवी-देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशिर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते. या दिवशी देवी-देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमायाचना करायची असते. या दिवशी लक्ष्मी-नारायण पूजन करणे अतिशय शुभ मानले गेले आहे. शक्य असल्यास सत्यनारायण पूजनही या दिवशी करणे उत्तम मानले गेले आहे. कार्तिक पौर्णिमेला शक्य असेल, त्यांनी आवर्जुन दीपदान करावे, असे सांगितले जाते. 

प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे खास महत्व असते, परंतु कोजागिरी पौर्णिमे प्रमाणेच कार्तिक पौर्णिमेस सुद्धा अतिशय महत्व आहे. असे म्हटले जाते कि सृष्टीच्या निर्माणा पासूनच कार्तिक पौर्णिमेचे मोठे महत्व राहिले आहे. ह्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान पुण्य करण्याचे व श्री सत्यनारायण पूजा करून त्याची कथा श्रवण करणे हे अधिक महत्वाचे आहे. ह्या व्यतिरिक्त भगवान श्री शंकर व माता पार्वती ह्यांच्यासह कार्तिकेय व श्रीगणेश ह्यांचे सुद्धा ह्या दिवशी पूजन करणे आवश्यक आहे. शिव परिवारावर मध व दुधाने अभिषेक केला असता अक्षय फल प्राप्ती होते. 

ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो. अशा वेळेस कार्तिक पोर्णिमेसह सर्व पौर्णिमेस चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ्य देण्याची सुद्धा प्रथा आहे. माता लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी ह्या दिवशी भगवान श्री विष्णुसह माता लक्ष्मी देवीची पूजा करावी. श्रीसूक्त पठण कराव. 

दंतकथा 

त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.

तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते. त्यांची नावे तारक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली. मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले की, देवांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. मात्र, तसे झाले नाही आणि शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी शंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरू झाली. जे जे चांगले ते ते रुजवावे, वाईट तेवढे काढूनी टाकावे, हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे.

 काही पौराणिक कथांनुसार, श्रीविष्णूंनी यात दिवशी प्रथम अवतार धारण केला होता, असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. पुराणांनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलायापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता. अठरा पुराणांमध्ये मत्स्यपुराणाचा समावेश आहे. श्रीविष्णूंनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला, तो पुढे मत्स्यपुराण म्हणून प्रसिद्ध झाला, अशी मान्यता असल्याचे सांगितले.

त्रिपुरी पूर्णिमे बद्दलची माहिती काही सोशेल साईट वरून संकलित केली आहे आणि तुमच्या सोबत शेयर केली आहे. 





तुळशी विवाह

 


तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतींच्या रोपांची विष्णू किंवा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी जी एकादशीपासून करायचा पूजोत्सव अशी प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा त्यांचे व तुळशीचे लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे, म्हणूनच तिला हरिप्रिया असेही म्हंटले जाते व तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. तुलसी व्रत हे एक काम व्रत आहे. तुलसी विवाह करणे हा या व्रताचा भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लागते .

तुळसीचे पान. एक त्रलोक्य समान, उठोनिया प्रात:काळी, वंदी तुळसी माऊलींनाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळसीसी योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही’’अशा शब्दांत संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.

हिंदू धर्मा मध्ये तुळशीला पाप – नाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही  भारताच्या सर्व प्रांतात व सर्व प्रदेशात उगवणारी वनस्पती आहे. बहुतांश हिंदू कुटुंबीयांच्या घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णू चा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात. तुळशी विवाहाचे एक व्रत मांडले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते.

विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात, त्याला ‘प्रबोधोत्सव’ असे नाव आहे. हा प्रबोधोत्सव आणि तुलसी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. तुळशीच्या लग्नानंतर हिंदू लोकांच्या विवाहासंबंधी कार्यास सुरुवात होते. 

हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते, तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मातील धारणेमध्ये तुळशीला महत्त्व आहे. 

तुळशीचे लग्न हा पूजोत्सव आहे. त्यात तुळस ही वधू, बाळकृष्ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची / तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची-गेरु व चुन्याने रंगरंगोटी करतात व तिला छान असे सजवितात. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून, सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. 

तुळशीच्या चारी बाजूंनी उसाचा मंडप उभारला जातो. मग विष्णुस्वरूप श्री बाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते. बाळकृष्णाला आवाहन करून त्यास स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज, तसेच नवेद्य अर्पण करून त्याची आळवणी करतात. त्यानंतर तुळशी मातेचीही षोडशोपचारांनी पूजा करून, तिला सौभाग्य लेणे, नवीन साज, नवीन वस्त्र देऊन सालंकृत सजवतात. तुळस आणि श्रीकृष्ण विवाहासमयी चौरंगाच्या एका बाजूस श्रीकृष्ण तर दुस-या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्ये अंतरपाट धरला जातो. मग सर्वाना अक्षता वाटल्या जातात. त्यानंतर मंगलाष्टके म्हटली जातात आणि गोरज मुहूर्तावर (सायंकाळी) श्रीकृष्ण-तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो.  तुळशी जवळ बोर चिंच आवळा सितापळ कांदयाची पात ठेवतात. रात्रीच्या आत पूजा आटोपल्यावर वृंदावनाभोवती ऊस रचून केलेल्या मांडवाभोवती आरती, दीपाराधना उरकण्यात येते. त्यावेळी तुळशीच्या मुळात चिंचा व आवळे ठेवतात. जमलेल्या लोकांस लाहय़ा, कुरमुरे, उसाच्या गंडे-या देण्यात येतात. हा विवाह केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे सांगितले जाते. ते व्रत तुलसीवनात करणे हे विशेष पुण्यप्रद मानले आहे. या व्रताने सौभाग्य, संतती, संपत्ती, विद्या इत्यादी गोष्टींची प्राप्ती होते. तसेच रोगनिवारणही होते, अशी समजूत आहे.

तुळस ही बहुगुणी व प्रभावी औषध आहे. त्यामुळे शास्त्राने देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे. एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे, हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले जाते. अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे. श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तो अन्य कशाने होत नाही. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. तुळशीपूजेशिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैवुंâठात जातो, अशी श्रद्धा आहे. म्हणून मृतकाच्या मुखात गंगाजळाप्रमाणे तुलसीपत्रही ठेवण्यात येते. तुळशी दुषित वायू शोषून घेत प्राणवायू सोडते, हे शास्त्रानेही सिद्ध झाले आहे. म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन बांधले जाते. तसेच शहरी भागात खिडकीतल्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते. दारात तुळशी असणे, हे शुभलक्षण मानले जाते.

हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला ‘पवित्र झाड’ असं म्हटलं आहे. ग्रीक भाषेतील ‘बेंझिलिकॉन’ हा तुळशीसंबंधीचा शब्द ‘राजयोग’ या अर्थाचा आहे. तुळशीला फ्रेंच व जर्मन भाषांतही ग्रीक शब्दांप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहेत. इटाली व ग्रीस देशांत प्राचीन काळी तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे, असे मानत असत.

तुळशीची आरती :

जय देव जय देवी जय माये तुळशी ।निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी। ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी।

शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।गोसावीसुत विनवी मजला तूं तारी।


दंतकथा १ 

तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणात आहे. ती अशी की, जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योद्धा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती.

पुढे, देव व दैत्य यांच्यांत युद्ध होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपटकारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली. विष्णूने दोन वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून, आपले शीर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते दोन अवयव वृंदेपुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली.

इतक्यात, एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपटवेषधारी जालंधरास म्हणजेच विष्णूस जिवंत केले. वृंदेने आपला पती जिवंत झालेला पाहून आनंदातिशयाने त्याला मिठी मारली. अशा प्रकारे, विष्णूने वृंदेसमवेत राहून तिचे पातिव्रत्य भंग केले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रत्यभंगामुळे जालंधर बलहीन होऊन लढाईत मारला गेला. काही काळानंतर, वृंदेस खरा प्रकार कळताच तिने क्रोधित होऊन विष्णूस शाप दिला, की त्याला पत्नीचा वियोग घडून दोन मर्कटांचे सहाय्य घेण्याची पाळी त्याच्यावर येईल. त्याप्रमाणे पुढे रामावतारी तसे घडलेल. त्यानंतर लगेच वृंदेने अविकाष्ठ भक्षण केले. सती वृंदा हिच पुढे तुळशीरूपाने प्रगट झाली, तेव्हा तिचे महात्म्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वत: तिच्याशी लग्न केले. त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात.

विष्णूलाही आपण कपटाने एका महासाध्वीचा नाहक नाश केला हे पाहून वाईट वाटले; इतकेच नव्हे तर तो वृंदेच्या रक्षेजवळ वेडय़ासारखा बसून राहिला. विष्णूचे वेड घालवण्यासाठी पार्वतीने तेथे, वृंदेच्या रक्षेवर तुळस, आवळा व मालती यांचे बी पेरले. त्यातून तेथे तीन झाडे उत्पन्न झाली. त्यांतील तुळस ही आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे वाटून विष्णूस ती प्रिय झाली.

तुलसी श्री सखी शिवे पाप हरिणी नारायण मनः प्रिये




मसाल्याचा मसला भाग ९ - वेलदोडा


नमस्कार मंडळी मी तुमच्या रोजच्या मिसळण्याच्या डब्ब्यात नसतो पण तुम्ही जो वर्षभराचा गरम मसाला करून ठेवता त्यात मी वेलची आणि मोठी वेलची अगदी आवर्जून उपस्थित असतो. शिवाय कोणत्याही गोड पदार्थात मी आवर्जून घातला जातोच. पाहूया माझी माहिती, स्वयंपाकातील आणि तुमच्या आयुष्यातील माझे महत्व. 

भारतात उगवणारी हि एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या फळास वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची किंवा एला असेही म्हणतात वेलदोडा हा मसाल्याचा एक प्रकार आहे. ह्याचा वास खूप सुंदर असतो. वेलदोडा साधारणपणे गोड खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. विड्याच्या पानातही वेलदोडा टाकतात. याशिवाय मसालेभात, पुलाव, बिर्याणी यांत वेलदोड्याचा बडी इलायचीनामक प्रकार वापरला जातो.

वनस्पती मूळची भारतातली आहे. सुमारे आठव्या शतकाच्या आसपास वेलदोड्याचा शोध लागला असावा असा एक मतप्रवाह आहे. प्रामुख्याने भारतात व श्रीलंकेत वेलचीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. नेपाळ, ग्वाटेमाला, मेक्सिको, थायलंड व मध्य अमेरिकेतही या पिकाचे उत्पादन घेतले जाते.

भारतात फार पूर्वीपासून एला नावाने वेलदोड्याचा वापर केलेला आढळतो. भ्रम उत्पन्न करण्यास वापरलेल्या काढ्यात वेलदोड्याचा उपयोग कौटिलीय अर्थशास्त्रात नमूद केला आहे. संस्कृत काव्यग्रंथांत वेलदोड्याचे उल्लेख आढळतात.

 वेलची हिं. छोटी इलाची गु. इलाची क. येलक्की सं. बहुला, एला, चंद्रबला इं. लेसर अथवा मलबार कार्‌डॅमम लॅ. इलेटॅरिया कार्‌डॅमोमम कुल-सिटॅमिनी, उपकुल-झिंझिबरेसी). वेलदोड्याला इंग्रजीत मसाल्याची राणी (क्वीन ऑफ स्पायसीस) असे नाव आहे व भारताला परकीय चलन मिळवून देणारे हे दुसऱ्या क्रमांकाचे मसाल्याचे पीक आहे. ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) औषधीय वनस्पती असून हिचे मूलस्थान व मोठ्या प्रमाणावर लागवड दक्षिण भारतातील सदापर्णी जंगलात आहे. 

मोठा वेलदोडा किंवा मसाल्याचा वेलदोडा (ॲमोमम सुबुलेटम) या जातीची लागवड नेपाळ, बंगाल, सिक्कीम व आसाममध्ये पर्वतातील प्रवाहांच्या कडेने दलदलीच्या जागी करतात.

मोठ्या वेलदोड्याची फळे गर्द लाल-तपकिरी, गोलसर, २·५ सेंमी. लांब असून प्रत्येकात पुष्कळ बिया असतात, त्या साखरेसारख्या गोड दाट गराने एकत्र धरून ठेवलेल्या असतात. याच्या बियांचे वेलदोड्यासारखेच गुणधर्म असतात. त्यांचा मेवामिठाईत उपयोग करतात. उत्तेजक, कडू व रेचक औषधांना स्वाद आणण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. बियांपासून काढलेले तेल पाकणीच्या शोथावर (दाहयुक्त सुजेवर) लावतात.

वेलदोड्याची लागवड बियांपासून तयार केलेली रोपे लावून अथवा जुन्या पिकाच्या गड्‌डयातील ठोंब लावून करतात. रोपे लावून लागवडीची पद्धत सर्वसामान्यपणे वापरात आहे. परंतु वेलदोड्याचे फळ निसर्गात परपरागण [→ परागण] पद्धतीपासूनच तयार होत असल्यामुळे या पद्धतीत एकसारख्या गुणधर्मांची फळे मिळत नाहीत. दुसऱ्या म्हणजे शाकीय पद्धतीत चांगली जोमदार झाडे निवडून त्यांची ठोंबे लावल्यास चांगले उत्पन्न येते आणि रोपे लावून पीक मिळण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यापेक्षा पुष्कळच कमी काळात पीक मिळते. ही पद्धत कमी खर्चाचीही आहे परंतु मोठ्या क्षेत्रावर लावण्यासाठी पुरेशी ठोंबे मिळणे कठीण जाते. शिवाय रोगट ठोंबांतून व्हायरसजन्य रोग पसरण्याची शक्यता असते. शारीरिक अभिवृद्धीच्या पद्धतीने सतत लागवड केल्यास पिकाचा ऱ्हास होण्याचीही शक्यता असते.

नारळ सुपारी बागेत सिंचनाची सोय केलेली असल्याने त्यात वेलदोड्याचे भागते. या पिकासाठी जमीन मात्र उत्तम निच-याची असणे आवश्यक आहे. फुलांच्या तु-यांची ठेवण, फळांचा आकार आणि झाडाची वाढ यावरून मलबार, म्हैसूर, वझुक्का या मूळ तीन जाती प्रमाणित करण्यात आल्या आहेत. आता काही हायब्रीड जातीसुद्धा बाजारात आल्या आहेत. मलबार जातीच्या रोपांची लागवड कमी उंचीवरील प्रदेशात केली जाते. म्हैसूर जातीचे झाड दणकट असून या जातीची लागवड ९०० ते १२०० मीटर उंचीवरच्या प्रदेशात केली जाते. वझुक्का ही जात मलबार व म्हैसूर जातीच्या नैसर्गिक संकरातून निर्माण झाली आहे. केरळ राज्यात याची लागवड केली जाते. नारळी-सुपारीच्या बागेत मिश्रपीक म्हणून व सावलीसाठी सिल्व्हर ओकची लागवड करून वेलदोड्याची स्वतंत्र लागवड करता येते.

फळे काढणीचा प्रमुख हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये असतो. तु-यातील सर्व फळे एकावेळी काढणीसाठी तयार होत नाहीत. पूर्ण वाढलेली फळे रसरशीत, फिक्कट पिवळसर हिरवी व चकचकीत असतात. आतील बिया काळ्या असतात. फळे देठांसह अंगठय़ाच्या नखाने किंवा कात्रीने काढावी लागतात. वेलदोड्याची काढणी करताना काळजी न घेतल्यास फळावरून बारीक धागा निघतो व अशी फळे वाळवताना तडकतात. फळे अती पक्व झाल्यास वाळवताना तडकतात व कोवळी काढली तर सुरकुत्या पडतात. सर्वसाधारण बागेतून हेक्टरी शंभर ते १५० हेक्टर उत्पन्न मिळते. लागवडीनंतर १५ वर्षानंतर झाडांचे उत्पन्न कमी होण्यास सुरुवात होते. वेलदोडा उन्हात वाळवला जातो. स्वच्छ सूर्यप्रकाशात चार-पाच दिवसांत वेलदोडा वाळतो. वाळलेला वेलदोडा हवेतील आद्र्रता शोषून घेऊ नये म्हणून हवाबंद डब्यात साठवावा. उन्हात वाळवलेल्या वेलदोड्याचा रंग फिक्कट हिरवा होतो. वाळवताना काळजी न घेतल्यास दाणे ओलसर राहतात. त्यावर बुरशी वाढते.

वेलची एक सुगंधी मसाला आहे. वेलचा स्वादाने स्फूर्ती येते. वेलचीचा उपयोग गोड पदार्थात चव वाढविण्यासाठी करण्यात येता. तसेच वेलचीचा उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत. वेलचीने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी वेलची मदत करते. पोट फुगलं किंवा जळजळ होत असल्यास वेलची यातून तुमची सुटका करते.

तीन वेलची, आल्याचा एक छोटा तुकडा, थोडीसी लवंग आणि धणे वाटून त्याची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने पचनाबाबत जी समस्या असेल ती दूर होते.

वेलचीमध्ये एक अॅंटी बॅक्टिरियल गुण असतो. तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते. दररोज एक वेलची खा किंवा चहातून वेलचीचा आस्वाद घ्या.

अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर वेलची उत्तम. त्यासाठी वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते.

वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर अॅसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते.

खोखला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास वेलची मदत करते. सर्दी झाली असेल तर गरम पाण्यात वेलची तेलाचे काही थेंब टाकून ते नाकात टाकल्यास आराम मिळतो.

कशी वाटली माझी माहिती कॉमेंट मध्ये नक्कीच कळवा आता पुढच्या भागात आपण पाहू चक्री फुलाची माहिती.




कार्तिकी एकादशी



संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादश्या येतात. प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात एक व अधिक मास असल्यास त्या दोन एकादश्या जास्त येतात. कार्तिकी एकादशी व आषाढी एकादशीमध्ये आषाढी एकादशीला जास्त महत्व आहे. आषाढी एकादशीस शायनी व कार्तिक शुद्ध एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागी होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.

कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे. तुलसी विवाहात तुळशीचा विवाह कृष्णाशी (विष्णूशी) लावतात.

पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस.कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे.आषाढी एकादशीसाठी ज्याप्रमाणे वारकरी पायी पंढरपूर येथे पायी चालत जातात, त्याप्रमाणे कार्तिकी एकादशी वारीही केली जाते. वैष्णव संप्रदायात आणि भागवत संप्रदायात या एकादशीला उपवास केला जातो. साधारणपणे सर्वच मराठी माणसे आषाढी आणि कार्तिकी एकादशांना उपवास करतात.

आवळी भोजन म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला कुटुंबाची आवळीच्या बागेत काढलेली एक दिवसाची सहल. या दिवशी सकाळी आवळीच्या झाडाची पूजा करतात, व दुपारी तिथेच केलेल्या स्वयंपाकाचा सहकुटुंब आस्वाद घेतात. मुले झाडावर बांधलेल्या दोरखंडाच्या झोपाळ्यावर झोके घेतात, चिंचा, पेरू, आवळे पाडतात, खातात आणि खेळतात. मुली सागरगोटेही खेळतात. संध्याकाळी सर्व कुटुंबे आपआपल्या घरी परततात.

आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते . आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात, तर कार्तिकी एकादशीला पंढरपूरहून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते.

पंढरपूर मंदिर परिसर 

या दिवशी लोक उपवास करतात. भजन-कीर्तनात दिवस घालवितात. विठ्ठलाची महापूजा करतात.

क्षीरसागरात शयन करत असलेले श्री विष्णूंना उठवून मंगळ कार्य आरंभ करण्याची प्रार्थना केली जाते.

मंदिर आणि घरामध्ये उसांचे मंडप तयार करून सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यांना बोर, आवळ्यासह इतर मोसमी फळांचा नैवेद्य दाखवला जातो.

 मंडपात शालिग्राम आणि तुळशीचा विवाह सोहळा आयोजित केला जातो.

मंडपाची प्रदक्षिणा घालून अविवाहित लोकांच्या विवाहासाठी प्रार्थना केली जाते.

या एकादशीला शालिग्राम, तुळस आणि शंख यांचे पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं.

एकादशीला दिवे प्रज्वलित केले जातात आणि फटाके फोडून आनंद साजरा करतात.

दिवशी लवकर उठून नदी किंवा समुद्रावर जाऊन स्नान करावे. आपल्या कुलदैवतांची व विष्णूची पूजा करून तुळशीपत्र वाहवीत.

या एकादशीबद्दल एक कथा आहे -

    मृदुमान्य राक्षसाने भगवान शंकरांची भक्तिपूर्वक आराधना केली. त्याचा भक्तिभाव पाहून भोलानाथ शंकर प्रसिद्ध झाले. त्यांनी मृदुमान्य राक्षसाला वर दिला कि, "तू कोणाकडूनही मारणार नाहीस. पण एका स्त्रीच्या हातून मारशील." असा वर मिळताच या राक्षसाचा मृदू पण नष्ट झाला. त्याने प्रथम देवांचा पराभव केला. परंतु शंकरानेच त्याला वर दिल्यामुळे कोणाचेच काहीच चालले नाही. सर्व देव व भगवान शंकर एका गुहेत लपले. त्यांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिचे नाव एकादशी होते. तिने मृदुमान्याला ठार मारले. तेव्हा भरपूर पाऊस कोसळला. त्यामुळे देवांची अंघोळ झाली व भुयारात लपून बसल्यामुळे उपवासही झालाच.  त्या दिवशीच्या घटनेपासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याची प्रथा सुरु झाली. या दिवशी लवकर उठून नदी किंवा समुद्रावर जाऊन स्नान करावे. आपल्या कुलदैवतांची व विष्णूची पूजा करून तुळशीपत्र वाहवीत.

पंढरपूर – हे श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी यांचे पवित्र स्थान आहे. पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणुन पण प्रसिध्द आहे.  सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून ७२ कि.मी. अंतरावर वसले आहे. पंढरपूर रेल्वे स्थानक मिरज-कुर्डूवाडी-लातूर ह्या रेल्वे मार्गावर आहे.

श्री विठ्ठलाच्या प्राचीन मंदिराचे ई स ११९५ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आले. शहरात इतर हिंदू देवतांचे मंदिरे व अनेक संतांचे मठ (धर्मशाळा) आहेत. पंढरपूर शहर चंद्रभागा (भीमा) नदीच्या काठावर वसले आहे. आषाढी व कार्तिकी एकादशी व्यतिरिक्त पंढरपुरात १२ महिने नेहमीच महाराष्ट्रातील व लगतच्या राज्यातून असंख्य संख्येने भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. आषाढी व कार्तिकी वारीसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या निघून वाखरी येथे जमतात.

विठ्ठल मंदिरात काकडा आरती, महापूजा, महानैविध्य, पोशाख, धुपारती, पाद्यपूजा, शेजारती इत्यादी विविध नित्योपचार केले जातात. मुख्य मंदिरात नामदेव पायरी दरवाजातून प्रदेश करून पश्चिम दरवाजातून मंदिरातून बाहेर पडताना खालील देव देवतांचे दर्शन होते.

!!बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!! 

!!श्री ज्ञानदेव तुकाराम!! 

!!बोला पंढरीनाथ महाराज कि जय!!



संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...