लॉकडाउन तमाशा






जीवनावश्यक गोष्टी मिळतील बाकी सगळे बंद ठेवले जाईल असे जाहीर केले जाते. या काळात काय चालू असणार हे सांगितले जाते दूध,मेडिसिन इतकंच चालू राहील आणि बाकी सगळे बंद असेल ; घरात धान्याचा भाजीपाल्याचा साठा  करण्यासाठी व्यवस्थित वेळ शासनाने दिलेला असतो.

घरातच राहा बाहेर पडू नका हेच या दिवसात अपेक्षित असते पण तरीही काही महाभाग स्वतःच्या अतिहुशारीने नव्हे अतिशहाणपणाने ने घर बाहेर पडतातच. 

लॉक डाउन सुरू झाला 23 मार्च 2020 ला त्यानंतर न्युज चॅनेल्स नी कोण कुठे या लॉकडाउनचा फज्जा उडवतय हे दाखवायला सुरवात केली आणि गांभीर्याने ज्या गोष्टींची दखल घ्यायला हवी त्या अतिशय हास्यास्पद पद्धतीने दाखवल्या गेल्या.

पोलिस कर्मचारी वर्ग;  जे  दिवस-रात्र न पाहता कामावर रुजू होते त्यांना ही न जुमानता हे अतिशहाणे महाभाग रोज मॉर्निंग वॉक काय घेतात, रोज भाजीपाला आणायला बाहेर काय जातात, रोज वाणी सामानसाठी काय जातात. या सगळ्याची माहिती न्यूज चॅनल्स व्यवस्थित दाखवत होते. 

या महारथींना लाठ्या मारल्या तरी त्रास होऊ लागला. शेवटी हताश होऊन पोलीस कर्मचारी वर्गाने त्याची चक्क आरती ओवाळणी करायला सुरुवात केली. गांधीगिरीचा अवलंब करून सुध्दा हे सुधारले नाहीतच. हेही आपण पाहिलं.  

जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना त्यात कित्येक जण पिझ्झा बेस आहे का?? बेकिंग सोडा द्या ना, custurd आहे का?? पनीर, चीज, चिली फ्लेक्स, ओरिगणो या वस्तू घेत असायचे. या जीवनावश्यक वस्तू आहेत हे आताच लक्षात आले. 

कोणी म्हणालं दारूची दुकाने उघडा कारण अर्थ व्यवस्था व्यवस्थित होईल. जी दारूच्या दुकाना समोर झुंबड उडाली होती. न्यूज चॅनेल्स नी दाखवली. पहिली ना आपण घरी बसून;  मस्त चर्चेचा विषय होता तो. त्यानंतर साधारण 10 ते 15 दिवस देशाने दारूच्या माध्यमातून किती कमावले ह्याची चर्चा केली. 

लॉकडाउन संपत आला की माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा माननीय पंतप्रधान साहेब येऊन लॉकडाऊन वाढलाय आणि तो का वाढवलाय तर तुम्ही सुरक्षित राहावेत या साठी हे अत्यंत उत्तम प्रकारे आपल्याला पटवून देत होते. 

नक्कीच योग्य होते ते; या विषाणू सोबत लढताना घरा बाहेर न पडणे हेच महत्वाचे आहे हे ज्यांना समजले ते तुमच्या आमच्या सारखे खरंच शासनाच्या शिस्तीत राहूनच वागले. त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्या प्रमाणे सगळेच नियम पाळले. का? तर सगळे सुरळीत चालू व्हावे.

पण काही जणांच्या निष्काळजीपणाने हे सगळं हाता बाहेर जाऊ लागले आणि परत लॉकडाउन वाढवावा लागला. एकदा दोनदा नाही तर पाच ते सहा वेळा लॉकडाउन वाढवला  गेला.

रुग्ण वाढतायत म्हणून हा लॉक डाउन वाढवला जातोय मान्य आहे. पण कडक लॉक डाउन हा चक्क जोक झाला आहे. खरंच लोकं कितीही प्रयत्न करून काहींना काही क्षुल्लक कारणे देऊन बाहेर पडतायत आणि प्रशासन त्यावर कडक कारवाई का करत नाही.

अशा लोकांना सरळ तुरुंगात डांबून ठेवा नाही तर हॉस्पिटलमध्ये टॉयलेट्स साफ करायला ठेवा. 

खरंच हा कडक लॉकडाउन  सुरवातीलाच हास्यास्पद न होऊन देता काटेकोरपणे पाळला गेला असता तर कदाचित ही वेळ आली नसती.

माननीय साहेब; आम्ही जे तुमचे नियम पाळतो, आमचे व्यवसाय, उद्योगधंदे बंद करून सगळ्या नियमांची अंमलबजावणी करतो, आमची ऑफिसेस बंद आहेत, पगार बंद आहेत या सगळ्याचा विचार करावा आणि या लॉक डाउनला अतिशय कडक रित्याच बंद ठेवावा. अत्यंत कळकळीची विनंती आहे की या वेळी जो लॉकडाउन आपण वाढवला आहे तो कडक रीतीने त्याचे पालन करण्यात यावे आणि जे लोक पाळणार नाहीत त्याच्यावर सुचवलेली कार्यवाही करण्यात यावी. 

मध्यमवर्गीय यात भरडला जातोय...



No comments:

Post a Comment

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...